तिवारींची मनिषा हाणून पाडावीच लागेल पत्रकारांसाठी परवाना राज आणून माध्यमांवर निर्बन्ध लादण्याचे प्रयत्न केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकारं असोत,माध्यमं त्यांच्या डोळ्यात खूपत असतात.माध्यमांमुळे त्यांचे अनेक मनसुबे उद्ध्वस्थ होतात हेच त्याचं कारण असतं.त्यामुळं वृत्तपत्र स्वातंत्र्यावर ( त्यांच्या भाषेत मोकाट सुटलेल्या माध्यमावर ) नियंत्रण कसे आणता येईल याचे डावपेच वेगवेगळ्या पध्दतीनं आखले जात असतात.आणीबाणीत थेट वृत्तपत्रांवर निर्बध्द आणून त्यांचा आवाज बंद केला गेला,त्यानंतर बिहारच्या तत्कालिन सरकारनं काळे प्रेस विधेयक आणून वृत्तपत्रांवर अंकूश ठेवण्याचा प्रयत्न करून पाहिला पण त्याला मोठा विरोध झाल्यानं बिहार सरकारला आपले वृत्तपत्र स्वातंत्र्याची गेळचेपी कऱणारे विधेयक मागे घ्यावे लागले.आता केंद्रातील सध्याचे सरकार सभ्य भाषा बोलत वृत्तपत्राची गळचेपी करायला निघाले आहे.माहिती आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांची पत्रकारांसाठी लायसन्स राज आणण्याची कल्पना माध्यमांचा आवाज बंद करण्याच्या सरकारी योजनेचाच - See more at: batmeedar/articledetailshow.php?&id=641&cat=Mainnews#sthash.Mc2I8Vj8.dpuf
Posted on: Tue, 20 Aug 2013 05:51:22 +0000
Trending Topics
Recently Viewed Topics
© 2015