अदिती आणि निरव हे गेली - TopicsExpress



          

अदिती आणि निरव हे गेली दोन वर्षेरिलेशनशिपमध्ये आहेत... दिवसभर work मध्ये असणारा निरव दररोज संध्याकाळी 9 वाजता तिला फोन करायचा.. बोलताना त्याचं सुरवातीचं एक वाक्य कायमचं ठरलेलं असायचं.. ते म्हणजे hey dear i love u.. हे वाक्य ऐकल्याशिवाय अदितीला कधी झोपच यायची नाही.. एक दिवसही तिचा असा गेलेला नसतो की तिचं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं नाही.. एक दिवस सत्याचा सामना करायचं ठरवुन नीरव तिला घरी घेऊन गेला आणि त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळं सांगितलं.. त्याच्या आई वडीलांनी मोठ्या मनाने त्यांच्या नात्याला परवानगी दिली.. त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.. आणि त्यांना सल्ला दिला की एकदा आपल्या कुलदेवतेला जाऊन या.. त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकुन ते कुलदेवतेच्या दर्शनाला गेले.. दोघांनी देवाला नमस्कार करुन आपली इच्छा देवाजवळ व्यक्त केली. अदितीने मनोमनी देवाजवळ मागणं मागितलं की, देवा निरवच्या कोणत्याही bst 3 wishesh तु पुर्ण कर, एवढंच माझं मागणं आहे तुझ्याकडे.. निरवने मागणं मागितलं कि, देवा ही जे काही तुझ्याकडे मागतेय तेते तु तिला दे.. देवाजवळ आपल्या इच्छा व्यक्त करुनते तिथुन निघतात.. यानंतर अदितीचं त्यांच्या घरी येणंजाणं म्हणजे कायमचंच होऊन जातं.. पण तरीही त्यांच मोबाईलवरचंबोलणं काही थांबलं नव्हतं.. एक दिवस अदिती निरवला पुर्वकल्पना देऊन दोन दिवसांच्या summer campला जाते, एकडे निरवला त्याच्या working siteवर जोराचा अपघात होतो.. त्यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागतो.. त्याच्या आईवडीलांना याचा जोराचा धक्का बसतो पण ते हृदयावर दगड ठेवुन ठरवतात की यातलं काहीही अदितीला कळु द्यायचं नाही, कारण ती हे अजिबात सहन करु शकणार नाही.. दोन दिवसांच्या समर कँप नंतर जेव्हा ती त्याच्या घरी येते, तेव्हा त्याचे आईवडील त्याच्याविषयी सांगणं टाळु लागतात.. पण हार चढवलेला निरवचा फोटो बघुन, ती हिसक्याने तो हार खेचते.. आणि त्यांना म्हणते, अंकल ही कसली चेष्टा आहे, त्याच्या फोटोवर हार का चढवला होता तुम्ही..? शेवटी लपवता येणं कठीण वाटु लागल्यावर ते तिला सर्व हकीकत सांगुन टाकतात.. पण तिला ही गोष्ट न पटणारीअसते.. ती म्हणते,हे कसं शक्य आहे? गेले दोन दिवस आम्ही contact मध्ये आहोत,. त्याने मला कालच तर call केला होता.. ती तिच्या cellphoneमधील recived calls मधील निरवचा नंबर दाखवते.. पण त्यावर आता calling करुन पाहताना तो नंबर बिझी दाखवत असतो.. पण तरीही ती त्यांना पटवुन देण्यासाठी सांगते कि निरव every evening 9.00pm ला मला कॉल करतो.. आजही तो कॉल नक्कीच करेल. उत्सुकतेपोटी ते थोडावेळ तिच्यावर विश्वास ठेवतात.. ते सायंकाळचे आठवाजल्यापासुनच तिचा cellphone टेबलवर ठेवुन, तीन बाजुला तिघे जण बसलेले असतात.. तिघांच्या ही नजरा cellphone वर खिळलेल्या असतात.. तिघांच्याही मनात एक चलबिचल आणि भीती असते.. घड्याळात 9 चा ठोका पडतो.. आणि त्या मोबाईलची रिंग वाजते.. थरथरत्या हताने अदितीतो फोन लाऊडस्पीकरवर ON करते, आणित्यातुन आवाज येतो hey i love u dear..! हे ऐकुन त्याच्या आई वडीलांना हा विश्वास पटतो की हा निरव आहे तो म्हणतो, मला माहीतीये मम्मी पप्पा तुम्हीही मलाऐकताय, अदिती,मम्मी पप्पा जे काही म्हणतायेत की मी मेलोय ते अगदी खरंय.. अदितीः मग तु सध्या आमच्याशी बोलतकसा आहेस..?? कसली मस्करी करतोयस..?? निरवः ही सुद्धा तुझीच कृपा आहे.. तुने देवाकडे मागितलेले माझे3 wishash पुर्ण करण्याचे मागणे, यातली ही माझी दुसरी wish होती कि मी मृत्युनंतरही काही दिवस तुझ्याशी बोलु शकेन.. आणि तिच इच्छा सध्या देव माझी पुर्ण करतोय.. ते जाऊदे पण एक लक्षात ठेव तुला आता तुझं आयुष्य सावरायचंय आणि योग्य तो वर बघुन तुला लग्न करायचंय माझ्या आठवणीत तुतुझं आयुष्य बरबाद करु नयेस असं मला वाटतं.. अश्रुंनी भिजलेल्या चेहर्याने ती म्हणते, ठीकेय मी करीन लग्न..! पण तुझी पहीली wish काय होती. .निरवःअगं ती तर मी मंदिरातच मागितली होती, तु जे मागतीयेस ते तुला मिळो, आणि देवाने तुला दिलं... सॉरी पण मला जावं लागेल उद्यापासुन मी तुला कॉल करु शकणार नाही.. आई वडीलांना तो हिचं लग्न करुन देण्यास सांगतो आणि लगेच फोन कट होतो.... अदितीच्या मनातला एक प्रश्न तर अनुत्तरीतच राहतो की निरवची तिसरी wish काय होती.. . . . . . आज अदितीचं लग्न होऊन सहा वर्षे झाली.. ती एका श्रीमंत घरात नांदतीये.. संध्याकाळचे नऊ वाजतायेत.. तिच्या मोबाईलची पुन्हा एकदा रिंग वाजते, ती फोन उचलते हेलो कोन..? समोरुन आवाज येतो, hey i love u dear..! निरव हा तुचआहेस, कुठे आहेस तु..? कुठे होतास तु? तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नाही.. तिच्या cellphone वर पडलेला नंबर ती बघते.. तिच्याच बंगल्यातील hall मधला landline चा नंबर असतो तो... . bedroomमधुन बाहेर येऊन ती hall मधल्या त्या phoneकडे ती बघते.. फोनवर तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा असतो जो तिच्याकडेबघुन हसत असतो.. आत्ता तिला कळतं कीनिरवने देवाकडे त्याची तिसरी wish कोणती मागितली होती ते.. सहा वर्षे निरवच्या आठवणीँनी दबल्या गेलेल्या तिच्या अश्रुंना आज तिने तीच्या मुलाच्या रुपातील निरवला मिठीत घेऊन मोकळीक दिली, ज्यामुळे तिचं मन खुपच हलकं झालं.. मित्रांनो काहीजणांच प्रेम हे अद्वितीय असतं.. जे वास्तविकतेच्या खुपच पलीकडचं असतं.. पण खुपवेळा अशा प्रेमाला त्याचं योग्य स्थान मिळत नाही, आणि म्हणुन त्याची योग्य किंमत कळत नाही.. अन जेव्हा त्याची योग्य किंमत आपल्याला कळते.. तेव्हा त्याची किंमत ठेवण्याइतकी,आपल्याला किँमत राहीलेली नसते...
Posted on: Thu, 05 Sep 2013 07:08:03 +0000

Trending Topics



Recently Viewed Topics




© 2015