एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो..... . मुलगा - ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का ? . फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणाराआहे..... . मुलगा - मी त्याच्या पेक्षा कमी पैशातगवत कापून देईन, मला काम द्या ना..... . फोनवरील ताई :- पण मी त्याच्या कामावर समाधानी आहे..... . मुलगा - ताई, मी गवत कापण्याबरोबर फरशी साफ करण्याचे काम पण करेन..... . फोनवरील ताई - नको, धन्यवाद.....(असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात...) . तेथील दुकानदाराला त्याची दया येते, वतो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर..... . मुलगा - नाही, नको.. धन्यवाद..... . दुकानदार - अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ? . मुलगा - नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारा मीचं आहे, पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत कि नाही हे मला बघायचे होते..... . तात्पर्य :- १) आमीर खान, राहुल द्रविड हे जन्मापासून परफेक्ट नव्हते, स्वतःच्या चुका शोधून, त्यावर अभ्यास करून, मेहनत करून ते परफेक्ट झाले..... . २) प्रेम व मैत्री मध्ये दुसरा किती चुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमी बघत राहिल्यास, प्रेमाचं फुल कधीचं कोमजणार नाही..... . ३) भारत देश असा, भारत देश तसा, ह्या भारताचे काहीचं होणार नाही, असं म्हणत बसण्यापेक्षा, आपण भारतीय संस्कृती व भारताच्या सिद्धांताप्रमाणे खरोखर वागतो कि नाही, व आपण भारतासाठी काय करू शकतो हे पाहणे जास्त जरुरीचं आहे..... MD
Posted on: Mon, 08 Jul 2013 03:38:17 +0000